अकोला: अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली आहे. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड व्यक्त केली आहे.
अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकासमंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झाली आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
एका मिडिया नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply