“निवडणूक आयोगाची ही पद्धत योग्य नाही” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली व्यक्तिगत नाराजी!

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे सर्व निकाल 2 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला घेण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्व 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता एकच दिवशी, 21 डिसेंबर एकत्र जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिला.

लागोपाठ निवडणूक आल्याने मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये व प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी यासाठी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अचानक घेतलेल्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका पुढे नेणे हे कुठल्याच तत्वात बसत नाही असे स्पष्ट मत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. कायद्याचा चुकीचा अर्थ लावत निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *